समृद्धीचा अंतिम टप्पा फेब्रुवारीत खुला होणार

मुंबई – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून येत्या फेब्रुवारीअखेर हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल,असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली.मुंबईच्या बाजुकडील हा ७६ किलोमीटरचा टप्पा आहे. या टप्प्यातील १६ पूल आणि ५ बोगद्यांचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार असून हा टप्पा फेब्रवारीअखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणे अपेक्षित आहे,असे गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top