ठाणे जिल्ह्यातील पाणी महागणार एमआयडीसीचा दरवाढीचा प्रस्ताव

ठाणे – जिल्ह्यातील बहुतांश शहरांना बारवी धरणातून पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर एमआयडीसी प्रशासनाने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव संचालक मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव स्थगित ठेवून त्यावर निवडणुकांनंतर निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले होते.आता नव्या वर्षात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे शहरातील पाणी महाग होण्याची शक्यता आहे.

औद्योगिक वापरासह नागरी पिण्याच्या पाण्याची तहान भागवताना एमआयडीसीने पाणी योजनांच्या थकित पाणी बिलाची रक्कम दिवसेंदिवस वाढत असताना या योजन अद्ययावत करण्यासाठी मोठा खर्च केला आहे.त्यातच पाणीपट्टी आणि वीज दरांमध्ये वाढ होत असल्याने एमआयडीसीची आर्थिक कोंडी झाली आहे.त्यामुळे आपल्या पाणी योजनांचे दर वाढवण्यासाठी प्रस्ताव आणला आहे. गेल्या काही वर्षात एमआयडीसीकडून राज्यभर विकसीत केलेल्या औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनांचे अद्ययावतीकरण करणे, क्षमता वाढविणे, जलवाहिन्या बदलविणे, नवीन जलशुध्दीकरण केंद्र बांधणे,जलकुंभ बांधणे, पंपिंग मशिनरी बदलणे इत्यादी कामांवर बराच खर्च करण्यात आला आहे. याशिवाय पाच वर्षांपूर्वीच एमआयडीसीच्या बारवी धरणाची उंची वाढवून त्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे. बारवी पाणीपुरवठा योजने अंतर्गत १८०० मि.मी. व्यासाच्या मृदु पोलादी जलवाहिन्या बदलणे आणि जलशुध्दीकरण केंद्राच्या अद्ययावतीकरण करण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांवर एमआयडीसीचा बराच निधी खर्च झालेला आहे.त्यामुळे दरवाढीचा प्रस्ताव पुढे आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top