राज्यात आजपासून ‘स्वामित्व’ योजना सुरु

मुंबई – जमीन मालकीसंदर्भात राबण्यात येणारी ‘स्वामित्व’ योजना उद्यापासून राज्यात सुरु होत आहे. याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन माध्यमातून लोकार्पण हस्ते होणार आहे. राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर, खेड्यांमध्ये मूळ गावठाणात आपल्या वाडवडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे, हा या योजनेमागचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यातील सुमारे ३० हजार ५१५ गावांमधील जनतेच्या आयुष्याला उज्ज्वल भविष्याचा मार्ग मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top