ज्याने हा ग्रंथ वाचला त्याचा मृत्यू अटळ

निळावंती ग्रंथ ज्याने वाचला त्या व्यक्तीचा ६ महिन्यात मृत्यू तरी होतो किंवा ती व्यक्ती पूर्ण वेडी तरी होते असे म्हटले जाते. हा ग्रंथ वाचून त्यातील विद्या आत्मसात करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या सगळ्यांच्या पदरी मृत्यूच पडला. काळी जादू,तंत्र विद्या शिकवणाऱ्या या ग्रंथाच्या नादी शहाण्या माणसाने लागू नये असाच सल्ला दिला जातो. निळावंती वाचल्यावर पशू-पक्ष्यांची भाषा […]
\’डुमास समुद्रकिनारा\’ रात्री गेला तो परतलाच नाही
हा समुद्रकिनारा दिवसा स्वर्गाहून सुंदर दिसत असला तरी रात्री मात्र सैतानाचा नरक बनतो. इथे दिवसभर लोकांची प्रचंड गर्दी असते पण सूर्य जसजसा मावळू लागतो तसतसे लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किनारा सोडून पळ काढतात. काळोख होताच इथे विचित्र घटना घडू लागतात….या समुद्र किनाऱ्यावर अदृश्य शक्तींचा वास आहे असे म्हणतात. इथे रात्री गेलेला माणूस कधी पुन्हा परतलाच […]
सोन्याचे दागिने देणारे \’धामापूर तलाव\’
तहानलेल्याची तहान भागवणारी,मोठमोठया गावांना पाणी पुरवणारी,काठावर पशुपक्षी आणि प्राण्यांना आसरा देणारी अनेक तलावं असतात… पण कधी सोन्याचे दागिने देणारे तलाव पाहिलेय का? ऐकून आश्चर्य वाटेल पण खरेच सोन्याचे दागिने देणारे तलाव मालवणमधील काळसे धामापूर या गावी आहे… धामापूर तलावाच्या शेजारीच जवळजवळ पाचशे वर्षे जुने देवी भगवतीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराबाबत पिढ्यान् पिढ्या एक अद्भूत […]
\’लाखामंडल\’ मृत व्यक्तीला जिवंत करणारे मंदिर…
भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असणारी अनेक मंदिरे आपल्या देशात आहेत पण, मेलेल्या भक्तांनाच थेट जिवंत करणारे असेही एक रहस्यमयी मंदिर भारतात आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून काही अंतरावर असलेल्या या \’लाखामंडल\’च्या मंदिरात मृतदेह नेल्यास त्यात आत्मा पुन्हा प्रवेश करतो असे म्हणतात. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या जागृत महामंडेश्वर शिवलिंगासमोर पश्चिमेकडे तोंड करून उभे असलेले दोन द्वारपाल […]
९९ लाख,९९ हजार,९९९ गूढ मूर्तींचे गाव!
ईशान्य भारतात दूर कुठेतरी एका निर्जन जंगलात लपलंय एक रहस्य… रहस्य ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचं… चार हात आणि बाहेर येणारे तीन दात असलेला गणपती…भव्य दिव्य शंकर…दुर्गा देवी अशा अनेक मूर्ती इथे दगडांमध्ये कोरलेल्या आहेत. या मूर्ती कोणी बनवल्या? कधी बनवल्या? का बनवल्या आणि मुख्य म्हणजे एक कोटी पूर्ण व्हायला एकच मूर्ती कमी […]
\’जतिंगा\’चे रहस्य! जिथे पक्षी आत्महत्या करतात…
आसाममधील जतिंगा हे छोटेसे गाव ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या शेकडो पक्ष्यांनी भरून जाते… हे पक्षी जतिंगाचे आकाश पूर्णपणे व्यापून टाकतात… सकाळी गोल- गोल फेर धरत आकाशात फिरणारे हे पक्ष्यांचे थवे अचानक जमिनीकडे झेप घेतात आणि जतिंगाच्या जंगलात स्वत:चा जीव देतात. ऑक्टोबर उजाडेपर्यंत तर या ठिकाणी पक्ष्यांच्या मृतदेहांचा खच पडलेला असतो. अमाव्यसेच्या रात्री जेव्हा […]
