पालघरची पाणी चिंता मिटली! जवळपास सर्व धरणे भरली

पालघर- यंदाच्या पावसाच्या हंगामात आतापर्यंत पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांची पाणी चिंता मिटली आहे. कारण जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे भरली आहेत.वांद्रे आणि कवडास ही धरणे तर १०० टक्के भरली आहेत.तर अन्य सर्व धरणे ७० टक्क्यांपर्यंत पोहचली आहेत.

मागील तीनचार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या,
धामणी,कवडास आणि वांद्रे ही धरणे काठोकाठ भरली आहेत.तर मनोर,देवखोप, रायतळे,खांड,माहीम-केळवा आणि मोह खुर्द ही धरणे ७० टक्क्यांपर्यंत पाण्याने भरली आहेत.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात आतापर्यंत सरासरी २६९१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळीही वाढली आहे. वैतरणा नदीची पाणीपातळी १००.७५ मीटर इतकी झाली असून इशारा पातळी १००.९० इतकी आहे. पिंजाळ नदीचीही पाणीपातळी १००.४५ मीटर इतकी असून इशारा पातळी १०२.७५ मीटर आहे.तसेच सूर्या नदीची सध्याची पाणीपातळी ६.५२ मीटर असून इशारा पातळी ११ मीटर इतकी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top