पणजी- दक्षिण गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्य परिक्षेत्रात येत असलेल्या ११ पावसाळी धबधब्यांवरील बंदी अखेर वनखात्याने उठवली आहे. वनखात्याने याबाबत फेरसर्वेक्षण केल्यानंतर हा निर्णय जाहीर केला.
चार दिवसांपूर्वी गोव्याच्या वनखात्याने सत्तरी तालुक्यातील अनेक धबधब्यांवर पावसाळी पर्यटनासाठी बंदी घातली असल्याचे जाहीर केले होते
मात्र या निर्णयाला काही निसर्गप्रेमी व पर्यटकांनी विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे वनखात्याने फेरसर्वेक्षण करून ११ धबधब्यांवरील बंदी उठवली.यामध्ये सत्तरी तालुक्यातील पाली, हिवरे, चरवणे, गोळावली, गुळळे, चिदंबरम नानेली, मैदीनी गुळळे या धबधब्यांचा समावेश आहे.तर याच तालुक्यातील अभयारण्य परिक्षेत्रात येत असलेल्या दहा धबधब्यावर जाण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे.हे धबधबे धोकादायक आहेत.यामध्ये बाराजण, लाडक्याचो ओझर, तोणयेर सावर्डे, पेंड्राल, असोडे सुऊंगुली यांचा समावेश आहे