उरण – रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने शेतकर्यांनी शेतीची मशागत करणे सुरू केले आहे. खाडी पट्ट्यात अनेक शेतकरी सुकी भातपेरणी करताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अशा पेरणीला धूळवाफ पेरणी म्हणतात. मागील वर्षांपेक्षा यंदा भाताचे जास्त उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवूनच ही पेरणी सुरू केली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.