इचलकरंजी- शहरातील डेक्कनजवळच्या सिग्नल चौकातील गणेशनगरकडे जाणार्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी पालिकेने तत्काळ हे खड्डे बुजवावेत,अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल; असा इशारा शिवसेना गणेशनगर शाखेच्यावतीने देण्यात आला आहे.
नगरपालिकेने मध्यंतरी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे कंत्राट दिले होते.मात्र काही रस्त्यावरील खड्डे ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. त्यामुळे पावसाळा तोंडावर आल्याने या खड्ड्यात पाणी साचून अपघात होण्याची शक्यता आहे.तसेच नुकत्याच पडलेल्या मान्सून पूर्व पावसाचे पाणी रस्त्याच्या कडेला पडलेल्या खड्ड्यात साचून ते व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरत आहे.