राहुल गांधींचा हल्लाबोल
भुवनेश्वर
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी झारखंडहून ओडिशात पोहोचली. राहूल गांधी यांनी राउरकेला येथे भव्य रोड शो करत शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने त्यांना चांगली साथ दिली. राउरकेलाच्या पानपोश येथील गांधी चौकात राहुल गांधी यांनी केंद्र आणि नवीन पटनायक सरकारवर जोरदार टीका करताना 30 करोडपती ओडिशाची संपत्ती लूटणार असल्याचे सांगितले.
आज सकाळी राहुल गांधींनी सुंदरगढच्या राउरकेला येथील वेदव्यास मंदिराला भेट देऊन पूजाही केली. त्यानंतर त्यांनी आपल्या यात्रेला सुरुवात केली. त्यावेळी रोड शोदरम्यान राहुल गांधेी म्हणाले की, मुख्यमंत्री नवीन पटनायक, त्यांचा बीजेडी (बिजू जनता दल) आणि नरेंद्र मोदी यांचे ओडिशात भागीदारीचे सरकार आहे. बिजू जनता दल संसदेत भाजपला पाठिंबा देत आहे. भाजपच्या सांगण्यावरून बिजू जनता दलाचे लोकही आम्हाला त्रास देत आहेत. राज्यातील सुमारे 30 लाख लोक उपजीविकेसाठी मजूर म्हणून इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. कारण सरकार त्यांच्यासाठी काम करत नाही. ओडिशाच्या बाहेरून 30 करोडपती राज्याची संपत्ती लुटण्यासाठी येथे आले