समृद्धी महामार्गावर भीषणअपघात! तिघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबादजवळल समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात झाला. काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास महामार्गावर गाडीने अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हुल आनंद निकम (४७, द्वारकानगर हडको), शिवाजी वामनराव थोरात (५८, द्वारकानगर) आणि अण्णा रामराव मालोदे (७१) अशी मृतांची नावे आहेत. सर्व मृत छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत.
अपघात इतका भीषण होता की गाडीे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थशी दाखल झाले. त्यांनी मृतांच्या कुटूंबियांना या अपघाताची माहिती दिली. मृतांच्या कुटूंबियांनी देलेल्या माहितीनुसार, शिवाजी थोरात हे काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले होते. अण्णा मालोदे हे शेतकरी होते. त्यांचा एक मुलगा पोलिस दलात आणि दुसरा मुलगा बँकेत नोकरी करतो. राहुल निकम हे बांधकाम व्यावसायिक होते. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी क्रेनच्या साह्याने दूर करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान शुक्रवारी रात्री देखील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता आणि त्यात देखील तिघांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top