राज्यात ७ ते ११ मे पावसाची शक्यता

अहमदनगर – राज्यात या आठवड्याच्या अखेरीस म्हजेच ७ मे ते ११ मे दरम्यान वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी हा अंदाज वर्तवला आहे. रब्बी पिकाचा हंगाम या अवकाळी पावसामुळे धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. १ ते ५ मे दरम्यान काही ठिकाणी कोरडे हवामान अपेक्षित आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात उष्णेतची लाट आली आहे. तापमान ४२ ते ४३ अंशावर पोहचले होते. मात्र अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होणार आहे, असेही पंजाबराव डक यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top