मुंबई
राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे घराबाहेर पाडताना नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागातर्फे, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिय, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. तसेच आज देखील ठाणे, मुंबई, कोकण, सिंधुदुर्ग, रायगड, मध्य महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना आणि विदर्भ बुलढाणा जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. ठाणे शहरात सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर काही तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली.