रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपचा दावा! राणेंच्या ट्विटमुळे सामंत बंधूना धक्का

कणकवली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी कडून जोरात तयारी सुरु आहे. महायुतीत सामील असलेल्या तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या मतदार संघावर दावे करायला सुरुवात केली आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या बंधूनी जोरदार तयारी सुरु केलेई असतानाच आता हा मतदारसंघ भाजपचा असून भाजपच तिथून निवडणूक लढवणार असल्याचे ट्विट नारायण राणेंनी केल्यामुळे या मतदार संघावर हक्क सांगणाऱ्या शिंदे गटाच्या सामंत बधुना मोठा धक्का बसला आहे. परिणामी या मतदार संघावरून आता महायुतीत शिंदे गट विरुद्ध भाजपा असा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील इच्छुक आहेत. त्यांच्याकडून अनेक वेळा तशी इच्छा व्यक्त करण्यातही आली आहे. तर भाजपकडून याआधी आमदार रवींद्र चव्हाण आणि प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा होती. यानंतर पुढे निलेश राणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. आता नारायण राणे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग -रत्नागिरी मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे खासदार आहेत. ते गेल्या दोन लोकसभा निवडणुकींमध्ये या मतदारसंघांमधून निवडून येत आहेत. तर नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकीटावर २००९ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. पण त्यानंतर सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top