मराठ्यांना त्रास देणार्‍या नेत्यांना पहिल्या खपक्यातच पाडणार ! जरांगे पाटलांचा इशारा

जालना- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस होता.यावेळी ते म्हणाले की आम्ही ताकदीने काम करणार असून आता आम्ही जत्रेला नाही तर नेत्यांना पाडायला जाणार आहे . मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पहिल्या खपक्यातच पाडणार आहोत .
यावेळी अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील यांनी काही नेत्यांबाबत भाष्य केले. जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने आम्हाला आरक्षण द्यावे. नाही दिले तर नाईलाजाने आम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल. विशेष म्हणजे आता सरकारने बीड जिल्ह्यातील घटनांवर आवर घालावा असा आदेश दिला . पोलिस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे.सरकारच्यावतीने अजून मला कुणीही भेटायला आलेले नाही.मी माझ्या समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले आहे.मात्र नेत्यांनी आम्हाला विरोध करणाऱ्यांना शांत राहायला सांगितले पाहिजे. वास्तविक परळी बंदची हाक,अश्लील स्टेटस हे करायला नको.कुणाचेही स्टेटस ठेवू नका.मी निवडणुकीआधी देखील हेच सांगितले होते की एखाद्याने स्टेटस टाकले असेल म्हणजे समाजाने टाकले असे नाही असे ही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top