पालघर- पालघर एसटी आगारातून सोडल्या जाणार्या औरंगाबाद आणि नंदुरबार या दोन गाड्या खोडाळमार्गे ऐवजी जव्हारमार्गे पुढे वळविण्यात आल्या आहेत.त्यामुळे वाडामार्गे पुढे खोडाळा आणि त्यापुढील ग्रामीण भागातील प्रवासी आबालवृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत.
वास्तविक,खोडाळा आणि पुढे नाशिकला जाणार्या या मार्गावरील गाड्यांची संख्या मुळातच कमी आहे. वाडा आगाराची दुपारी साडेतीन वाजता एकच वाडा-शिर्डी अशी बस आहे.मात्र त्यामुळे नाशिक आणि पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयीन तसेच न्यायालयीन कामासाठी जाणारे चाकरमानी आणि आबालवृद्धांचे हाल होत आहेत.त्यांना मिळेल त्या खासगी वाहनातून लटकत प्रवास करावा लागत आहे.