नवी दिल्ली
नीट परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप करत अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली . यावेळी न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) नीटवर होत असलेल्या आरोपांवर उत्तर देण्याची नोटीस पाठवली असून याचिकेवरील पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे . मात्र तोपर्यंत समुपदेशन स्थगित करण्यास न्यायालयाने नकार दिला .
नीट परीक्षा २०२४ च्या निकालात गडबड झाल्याचा आरोप होत आहे . १,५६३ परीक्षार्थींना ग्रेस मार्क देण्याच्या निर्णयालाही आव्हान देण्यात आले आहे. पेपर फुटी झाल्याने ही परीक्षाच रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. नीटच्या परीक्षेत एकूण ६७ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळाले याबद्दलही शंका व्यक्त होत आहे .या परीक्षेत गडबड झाल्याचा आरोप करत शेकडो विद्यार्थ्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रात जोरदार आंदोलन केले . ही परीक्षा रद्द करण्याची आणि या प्रकरणी चौकशी करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे .