नवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात

नवी मुंबई – नवी मुंबईच्या नागरिकांना पावसाळ्यात पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. या धरणात केवळ ४१ दिवस इतकाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आठवड्यातून ३ दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील प्रत्येक विभागात आठवड्यातून तीन दिवस संध्याकाळी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबई शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. यासोबतच शहरातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या लोकसंख्यावाढीमुळे शहराला पाणी पुरवठा करणारे जलस्त्रोत कमी पडत आहेत. पावसाळा सुरू झाला असला तरी धरण क्षेत्रात पाऊस पडत नाही. परिणामी नवी मुंबई मनपाने पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऐरोली- मंगळवार, शुक्रवार, घणसोली- बुधवार, शुक्रवार, रविवार, कोपरखैरणे- मंगळवार, गुरुवार, शनिवार, तुर्भे- मंगळवार, गुरुवार, रविवार, वाशी- सोमवार, बुधवार, शुक्रवार, बेलापूर- सोमवार, बुधवार, शुक्रवार, नेरूळ- मंगळवार, गुरुवार, शनिवार, खारघर आणि कामोठे सोमवार, गुरुवार, शनिवार या प्रकारे पाणीपुरवठीा बंद राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top