नवी दिल्ली- देशातील तांदळाच्या किरकोळ किंमतीत वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात तांदळाच्या किंमती १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.त्यामुळेच आता केंद्र सरकारने देशात देशात ‘भारत राईस’ योजना आणली आहे.या योजनेंतर्गत २९ रुपये किलो दराने तांदूळ मिळणार असून काल मंगळवारपासून त्याची प्रत्यक्ष विक्री सुरू केली आहे.
हा अनुदानित तांदूळ ५ किलो आणि १० किलोंच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध असून त्यामुळे नागरिकांना कमी किंमतीत चांगला तांदूळ मिळणार आहे ,अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल यांनी दिली.सरकारने स्वस्त भारत डाळ, स्वस्त भारत आटानंतर आता स्वस्त तांदूळ बाजारात आणला आहे. केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी काल ६ दिल्लीतील कर्तव्यपथावर या योजनेचा शुभारंभ केला. अन्न महामंडळाने यासाठी ५ लाख टन तांदूळ ‘ नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ च्या माध्यमातुन विक्रीस आणला आहे. हा तांदूळ केंद्रीय ग्राहक भांडार आणि ‘ ई- कॉमर्स ‘ प्लॅटफॉर्मवरून विकला जाणार आहे.या तांदळाच्या प्रत्येक किलोत ५ टक्के कणी असणार आहे. सध्या भारत आटा २७.५० रुपये प्रति किलो तर विकला डाळ ६० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.