दिसपूर – आसाममध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पूराचा फटका राज्यातील ७ जिल्ह्यांना बसला असून आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने दिलेल्या माहितीनुसार ८ हजार ४८४ लोकांना ६६ शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे. या पूराचा फटका राज्यातील सव्वा लाख लोकांना बसला आहे.
आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण पूरस्थिती असून कामरुप, करीमगंज, धेमाजी, डिब्रुगड, कछार, तिनसुकिया आणि लखीमपूर जिल्ह्यांमधील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. विविध भागातील पुल, रस्ते, तटबंदी पाण्याखाली गेली आहे. कछार जिल्हयातील पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील ६७ हजार लोक या पुराने प्रभावित झाले आहेत.