नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींच्या गॅरेंटीचा भाजपाकडून जोरदार प्रचार चालू असतानाच नुकतेच जामिनावर तुरुंगातून सुटून आलेले केजरीवाल यांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर संपूर्ण देशवासियांना मोफत वीज आणि शिक्षण मोफत देण्यासह १०’ गॅरेंटी ‘ जाहीर केल्या आहेत.
काँग्रेसने आपला जाहीरनामा देशासमोर मांडताना ५ हमी दिल्या होत्या.आता अरविंद केजरीवाल यांनी १० हमी देत इंडिया आघाडीला सत्ता देण्याचे आवाहन केले. त्यांच्या १० हमीमध्ये गरिबांना २०० युनिट मोफत वीज,देशात सर्वांसाठी मोफत शिक्षण आणि प्रत्येक शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण आणि त्यासाठी राज्य व केंद्राकडून ५ कोटी रुपयांचा निधी, मोहल्ला दवाखान्यात लोकांना मोफत उपचार, चीनने बळकावलेल्या जमिनी परत मिळवणार, अग्नीवीर योजना बंद करून सैन्य भरती कायम करणार, तसेच सैन्याला विशेष अधिकार देणार, शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव देणार,दिल्लीला पूर्ण दर्जा देणार,दरवर्षी बेरोजगारांना २ कोटी नोकरी देणार,भाजपचे वॉशिंग मशीन तोडण्याचे काम करणार आणि सर्वांत शेवटची १० वी हमी म्हणजे जीएसटी योजना सुलभ करणार आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करणार अशी आहे.