अनंत अंबानीच्या विवाहासाठी’बीकेसी’तील रस्ते ४ दिवस बंद

मुंबई – अब्जाधीश उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा शाही विवाहसोहळा १२ ते १४ जुलै असा तीन दिवस वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्याला देश-विदेशातून असंख्य व्हिव्हिआयपी येणार आहेत. त्यांच्या गाड्यांना ये-जा करणे सोपे व्हावे म्हणून या परिसरातील काही रस्ते १२ ते १५ जुलै असे चार दिवस सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने काल परिपत्रक जारी केले.त्यानुसार १२ ते १५ जुलै या कालावधीत विवाह सोहळ्याला येणारे व्हीव्हीआयपी वगळता सर्वेसामान्यांसाठी लक्ष्मी टॉवर जंक्शन, धिरुभाई अंबानी स्क्वेअर अॅव्हेन्यू लेन क्र. ३, इंडियन ऑईल पेट्रोल पंप, डायमंड जंक्शन आणि हॉटेल ट्रायडंटकडे जाणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top