हुतात्मा दिनानिमित्त राजभवनला हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई

हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

देशाच्या स्‍वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी , पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखिल दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top