विशाखापट्टणम
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात काल रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत पाण्यात उभ्या असलेल्या ४० बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळातच त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेत ३० कोटी रुपयांपेक्षा जास्तचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काल रात्री मच्छीमारी करून अनेक बोटी किनाऱ्यावर परतल्या होत्या. यावेळी अचानक एका बोटीत स्फोट झाल्याचा आवाज आला. या स्फोटात बोटीला आग लागली. पुढे ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली आणि त्यात तब्बल ४० बोटी जळून खाक झाल्या. यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.