वाशिम :- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस बरसत असून त्यासोबत गारा आणि वादळीवाराही वाहत आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. पुढील काही दिवस असेच चित्र कायम राहणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाचे प्रादेशिक केंद्राकडून शुक्रवारी वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे वाशिम जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून अवकाळीचा प्रकोप सुरूच आहे. सततच्या पावसामुळे मानोरा तालुक्यात छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पूर येत आहे. तर अडाण धरणाच्या पाणी पातळीमध्येही वाढ झाली. परिसरातील विहिरीच्या पाणी पातळी वाढत आहे. याशिवाय जोरदार अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथील वाशिम कारंजा महामार्गावरील नदी दुथडी भरून वाहत असल्याने मानोरा तालुक्यात बेलोरा येथील नदीला आला मोठा पूर आला होता.
वाशिममध्ये अवकाळीचा प्रकोप! बेलोरा नदीला पूर
