राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस बरसणार

*अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
नागपूर: राज्यात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असून पुढचे तीन दिवस राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
सप्टेंबरमध्ये कृष्ण जन्माष्टमीपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला होता. तीन-चार दिवस पाऊस झाल्यानंतर मान्सूनने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा मान्सून सक्रिय होत असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय झाला आहे. विदर्भ आणि कोकणात १७ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव जिल्ह्यांना, तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना या चार जिल्ह्यांना “यलो अलर्ट” देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट’ दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे अजून काही दिवस राज्यात सर्वत्र पाऊस पडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top