मुंबई- उद्या रक्षाबंधनाला दुपारी दीड वाजेपर्यंत भद्राकाळ राहील. या कारणास्तव राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी १:३० नंतर सुरू होईल. रक्षाबंधनला भद्रा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विशेष काळ मुहूर्तासाठी पाहिला जात नाही. भद्राकाळ संपल्यानंतर सूर्यास्तापर्यंत कधीही बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतात. रक्षाबंधन रात्री साजरे करण्याचे विधान कोणत्याही धर्मग्रंथात नाही, मात्र काही कारणास्तव दिवसा रक्षाबंधन साजरे करता आले नाही तर सूर्यास्तानंतरही राखी बांधण्याची परंपरा आहे .
रक्षाबंधनाला सकाळ पासून दुपारी दीडपर्यंत भद्राकाळ
