मुंबईला थंडीची चाहूल तापमान ३ अंशाने घटले

मुंबई- महाराष्ट्रातील सध्याचे वातावरण पहाटे आणि सायंकाळी वातावरणात गारवा आणि दुपारी उकाडा असे आहे. मात्र ऑक्टोबर हिटने घाम काढल्यानंतर आता मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे.

मुंबईत ऑक्टोबर महिन्यात मागील दोन दिवसांच्या तुलनेत काल प्रथमच किमान तापमानात ३ अंश सेल्सिअसने घट झाली. मात्र,कमाल तापमानाचा पारा ३० अंशापेक्षा अधिक असल्याने दिवसा उकाडा कायम आहे.मुंबईत रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती असून, किमान तापमानाचा पारा काल २१.४ अंश सेल्सिअसवर होता मात्र,कमाल तापमानाचा पारा ३० अंशापेक्षा अधिक असल्याने दिवसा उकाडा कायम आहे.हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेत २१.४ अंश सेल्सिअस किमान, तर ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.कुलाबा केंद्रात किमान २५.५ अंश,तर कमाल ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रांवरील किमान तापमान शुक्रवारपेक्षा ३ अंशाने कमी होते.दरम्यान,सध्या उत्तरेकडून वारे वाहत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. दोन दिवसांनी पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top