नवी मुंबईत तीन तास वीजपुरवठा खंडित

नवी मुंबई – नवी मुंबईतील बहुतेक भागात आज दुपारच्या सुमारास बत्ती गुल झाली. तळेगाव ते खारखर या वीज वाहिनीत बिघाड झाल्याने नवी मुंबईत वीजपुरवठा खंडीत झाला. या सुमारास शहरात ७५० मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे जवळपास दोन ते तीन तास लोडशेडिंग करण्यात आले. यानतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण (एमएसईबी)चे कर्मचारी तांत्रिक बिघाड दूर केला. परंतु संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top