मुंबईतील पाणीकपात २९ जुलैपासून मागे घेणार

मुंबई :

शहरात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली १० टक्के पाणीकपात आता मागे घेण्यात येणार आहे. २९ जुलैपासून मुंबईतील पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जाहीर केला आहे.

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र जुलै महिन्यातील पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा वाढू लागला. आज सकाळी तो ६७ टक्क्यावर पोहोचला. आज विहार आणि मोडक सागर हे जलशय काठोकाठ भरले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार धरणे भरल्यामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top