मुंबई – सौदीच्या अरामको कंपनीचे अध्यक्ष यासीर ओथमन एच अल-रुमाय्यन यांची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून पुन्हा एकदा निवड झाली आहे. मात्र १६ टक्के भागधारकांनी रुमाय्यन यांच्या फेरनियुक्तीच्या विरोधात मतदान केले.
रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या कोकणातील प्रकल्पातील अरामको कंपनी ही एक गुंतवणूकदार आहे. हा प्रकल्प विनाशकारी असल्याचा दावा करत त्याला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळेच रिलायन्सच्या १६ टक्के भागधारकांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. मात्र बहुमताच्या जोरावर रिलायन्सने त्यांची संचालक मंडळावर फेरनियुक्ती केली.
शेअर बाजारात सादर केलेल्या कागदपत्रांद्वारे रिलायन्स इंडस्ट्रीजने याबाबत माहीती दिली आहे. टपाली मतदानाद्वारे कंपनीच्या ८३.९७ टक्के भागधारकांनी रुमाय्यन यांच्या फेरनियुक्तीच्या बाजुने कौल दिला. रुमाय्यन यांच्या स्वतंत्र संचालकपदाचा कार्यकाळ ५ वर्षांचा असणार आहे.
रुमाय्यन हे जगातील सर्वात मोठ्या वेल्थ फंडपैकी एक असलेल्या सौदीच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख आहेत.